मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

एमपीएससी परीक्षा MPSC Exam

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारला आवश्यक असणाऱ्या पदांची भरती केली जाते महाराष्ट्र  लोकसेवा आयोग या पदांची भरती करण्यासाठी राज्यस्तरावर  स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करतो या परीक्षांद्वारे गुणवत्ताप्राप्त उमेदवाराची निवड योग्य त्या पदासाठी केली जाते या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात दरवर्षी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीद्वारे उमेदवारांना परीक्षेसंदर्भातील माहिती देत असतो या माहितीच्या आधारे पात्र उमेदवार त्या त्या  पदासाठी अर्ज करतात त्यानंतर पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शिफारस अंतिम निवडीसाठी सरकारकडे केली जाते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या परीक्षांचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर परीक्षा संदर्भात शैक्षणिक पात्रता वय आरक्षण पण इत्यादी संबंधी माहिती ती सविस्तर पणे संकेतस्थळावरती  दिलेली आहे
तुम्ही आत्ता नुकतीच दहावी किंवा बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असाल आणि भविष्यामध्ये तुम्हाला या एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करायचे असेल तर आतापासूनच काही गोष्टी या जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे त्यामध्ये प्रमुख्याने तुम्ही जर नुकतीच बारावी उत्तीर्ण झालेला असाल तर तुम्ही या परीक्षेला पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना पात्र ठरतात म्हणून बारावीनंतर जवळजवळ अडीच तेच ते तीन वर्षाचा कालावधी तुमच्या हातामध्ये असतो तसेच जर तुम्ही दहावीनंतर या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रयत्न करत असाल तर साधारणत पाच वर्षाचा कालावधी तुम्हाला या परीक्षेच्या तयारीसाठी तुमच्या हातामध्ये असतो म्हणून हातामध्ये असलेल्या वेळेचा योग्य असा सदुपयोग होणे गरजेचे आहे म्हणजेच या तीन ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर कठोर परिश्रम घेतले म्हणजेच मन लावून या परीक्षांचा  अभ्यास केला तर पदवी प्राप्त केल्यानंतर लवकरच तुम्ही  ही परीक्षा  उत्तीर्ण  झालेले असू शकता म्हणून आतापासूनच नियोजनपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे तरच अत्यंत कमी कालावधी मध्ये वर्ग 1 किंवा वर्ग 2 चे अधिकारी आपण बनू शकता त्यासाठी दहावी किंवा बारावीनंतर या तयारीला सुरुवात करायची असेल तर काही महत्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे त्यामध्ये प्रथमतः तुमचा जो अभ्यास दहावी किंवा बारावीचा अभ्यास सुरू आहे तो सुरुवातीला योग्य पद्धतीने करा त्यानंतर मिळालेल्या वेळेमध्ये आतापासूनच इयत्ता पहिलीपासून ते  पदवीपर्यंतचे जे काही या परीक्षांच्या दृष्टीने  महत्त्वपूर्ण असलेल्या  विषयाचे पुस्तके आहेत ते अभ्यासायला सुरुवात करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रमुख्याने राज्यसेवा परीक्षा आणि पीएसआय एसटीआय आणि ए एस ओ यांच्यासाठी संयुक्तपणे एकत्र परीक्षा घेतली जाते या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम वेगळा असून त्या पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत अशा  वेगवेगळ्या टप्प्यावर घेतली जाते 
राज्यसेवा परीक्षा
ही परीक्षा पूर्व मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यावर घेतली जाते.

जायकवाडी धरण

जायकवाडी धरण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पैठण या ऐतिहासिक शहराच्या जवळ व व गोदावरी नदीवर बांधले...